पर्यावरणाचे
स्वरुप आणि वैशिष्टये :
पर्यावरण
म्हणजे काय ?
हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, कीटक, माणूस, सर्व मिळून पर्यावरण बनत असते.
निसर्गामध्ये या सगळयांचे प्रमाण व त्यांची रचना अशा विशिष्ट प्रकारे केलेली असते
की, पृथ्वीवर
एक संतूलित जीवन चालत राहावे अनेक कोटी वर्षापूर्वी जेव्हा माणूस , पशुपक्षी, कीटक, जंतू पृथ्वीवर जन्माला येऊ
लागले तेव्हापासून निसर्गाचे हे चक्र अखंड आणि सुरळीत रितीने चालत आले आहे. ज्याला
जितकी आवश्यक आहे. तितके त्याला मिळत असते आणि निसर्ग पुढच्यासाठीही व्यवस्था करत
आलेला असतो.
पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतीचा
परिसर असे सामान्यपणे म्हणता येईल. यामध्ये आपल्या भोवताली असणारे सगळेच घटक येत
असतात. आपल्या भोवतीचे वृक्ष, पक्षी प्राणी, माणूस, जमीन, पाणी, हवा, जंगल, डोंगर, या सर्वाचे एकत्रित असणे म्हणजे
परिसर असतो. पर्यावरणात या सगळयाच घटकांचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता
असते. कारण हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून असतात.
आपल्या भोवतालची प्रत्येक गोष्ट
पक्षी, प्राणी, डोंगर, जंगल, शेती, नदी, नाले, गवत, समुद्र, झाडे, आकाश हे सगळे आपण पाहात असतो, त्याप्रमाणे न दिसणारी परंतु
वातावरणात असणारी हवा आपल्याला जाणवत असते. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण शोध
घेतला तर आपल्याला नव्यानव्या आपण पूर्वी कधीही न पाहिलेल्या गोष्टीही दिसू
लागतात. गावातही नदी कुठून वाहात आली आणि ती आपल्या गावातून पुढे कुठे जाते आपण
पाहीले तर आपल्याला वेगळी दृश्ये वेगळी माणसे, वेगळे वृक्ष, सगळेच वेगळे दिसू लागते वेगळे
म्हणजे नव्याने नेहमी पाहतो त्यापेक्षा वेगळे आपण जातो. हा त्या त्या ठिकाणचा
परिसर वेगवेगळा असतो, त्या
त्या परिसरातल्या सर्व सजीवांचे एकमेकांशी वैशिष्टयपूर्ण संबंध असतात. आपण त्या परिसरात
राहिलो तर आपलाही इतरांशी संबंध येत असतो. असा परस्परसंबंध असलेले तिथले तिथले
वातावरण म्हणजेच पर्यावरण - परिसर परस्परसंबंधित असलेले घटक आणि त्यांचे
परस्परसंबंध यांचा अभ्यास म्हणजेच परिसर अभ्यास पर्यावरणाचा अभ्यास.
पर्यावरणातील घटक :
पर्यावरणातील मुख्य घटक म्हणजे
सूर्य, पाणी
जमीन, हवा आणि
यांच्या संयोगातून निर्माण झालेली सर्व सजीव सृष्टी.
हवा आणि वायुमंडळ :
हवा ही सजीव सृष्टीच्या
दृष्टीने आवश्यक असे जीवरक्षक तत्व आहे. तिच्याशिवाय सजीव जिवंतच राहू शकत नाही.
या वायुमंडळात प्राणवायूचा अनंत साठा असतो. स्वच्छ हवा सजीवांच्या आरोग्याला
लाभदायक असते.
वायूमंडळ संपूर्ण पृथ्वीभोवती
आवरणाच्या रुपात असते सूर्यापासून येणार्या अत्यंत उष्ण आणि हानीकारक किरणांपासून
हे वायुमंडळाचे आवरण सजीवांचे रक्षणच करीत असते. तसेच या आवरणांमुळे सजीवांचे सौर
व अंतरिक्षिय विकिरणांमुळे होणार्या हानीपासून रक्षण होत असते.
हे वायूमंडळ पृथ्वीपासून
सर्वसाधारणत:दहा हजार किलोमिटर अंतरापर्यत पसरलेले ओ. या वायुमंडळाचे पाच प्रकार
आहेत. अधो मंडळ , समोष्ण
मंडळ, मध्य
मंडळ, आयन मंडळ, आणि बाह्य मंडळ.
हवेचे घटक :
या हवेत आपल्याला जीवनावश्यक
असणार्या प्राणवायूबरोबरच नायट्रोजन, कार्बनडायऑक्साइड, निऑन, हिलीयम, हायड्रोजन, ओझोन, व धुलीकण, बाष्ण, असे अनेक घटक मिसळलेले असतात.
त्यांचे नैसर्गिक प्रमाणे निसर्गचक्राला संतुलित ठेवण्याचे महत्वाचे कार्य करीत
असते. या घटकाच्या प्रमाणात बदल झाला तर जीवसृष्टी धोक्यात येते. पक्षी, प्राणी, माणूस यांसारखे सजीव प्राणवायू
घेतात. आणि कार्बन डायऑक्साइड सोडतात. तर या उलट वनस्पती कार्बन डायऑक्साइड शोषून
घेऊन प्रकाशसंश्लेषण क्रियेतून प्राणवायू सोडतात. त्यामुळे वृक्षतोडीमुळे कार्बन
डायऑक्साइडचे हवेतील प्रमाण वाढत जाते. एकीकडे प्राणवायूचे प्रमाण कमी आणि
दुसरीकडे कार्बन डायऑक्याइडचे वाढते प्रमाण यांमुळे पृथ्वीचे तापमान वाढण्याचा
धोका उत्पन्न होतो.
पाणी :
पाणी म्हणजे जीवन असे आपण
म्हणतो ते अक्षरश: खरेच ओ सर्वकाही पाण्यापासूनच निर्माण झाले ओ आणि सर्वकाही
पाण्यामुळेच जिवंत असते. प्रत्येक सजीवात-त्यात वनस्पतीही आल्याच - पाण्याचे
विशिष्ट प्रमाण असते. मानवाच्या शरीरात ६५ टक्के पाणी असते. हे दोन झाडांच्या
सांध्याना ओलसर ठेवीत असते. त्यामुळे एकमेकांवर घासून होणारी त्यांची झिज टाळली
जाते. ह्र्दय, मेंदू, अशा महत्वपूर्ण अवयवांच्या
भोवती पाण्याने बनलेल्या एका द्रव्याचे कवच त्या अवयवांचे रक्षण करीत असते. हे
पाणी शरीरभर विविध भागांत असते, प्राणवायू पोषकतत्वे तसेच कार्बन डायऑक्साइडचे वाहक म्हणून
पाणी कार्य करीत असते. तसेच मलमुत्र, घाम या रुपातील शरीरातील टाकाऊ
पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्यही पाण्याच्या माध्यमातूनच होत असते. शरीरात पाणी
पूरेसे नसेल तर शरीर जगू शकत नाही, ते यामुळेच
वनस्पतींनाही पाणी आत्यावश्यक
असते आपण पाहातोच. त्यांच्यामध्ये ४० टक्के पाणी असते, काही जलवनस्पतींमध्ये हे प्रमाण
९० टक्के असते अंडयात ७४ टक्के तर काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते. पृथ्वीवरील
प्रत्येक सजीवांच्या पोषणाला वाढीला, जगण्यासाठी पाणी लागतेच लागते.
पाण्याशिवाय जीवन नाही असे म्हणतात ते यामुळेच.
पाण्याचे रुपे :
पाणी घन, द्रव्य आणि वायू या तीन अवस्थेत
स्वतंत्र रुपाने राहू शकते. घन रुपाने र्बफ, द्रव रूपाने पाणी आणि वायू रूपाने
वाफ या तिन्ही रुपांमध्ये केवळ अवस्थेत बदल सतो पण या तिन्ही रुपांत मूळ पाण्याचे
गूणधर्म बदलत नाहीत.
या पृथ्वीवर अनेक स्त्रोतांतून
पाणी मिळत असते. अशा या विभिन्न स्त्रोतांतून मिळणार्या पाण्याचे गूणधर्मी
अर्थातच वेगवेगळे असतात.
पाण्याचे विभिन्न
स्रोत व गुणधर्म :
(१) सागरी पाणी: पाणी खारे आणि
विविध क्षारांनी युक्त असे असते. ते पिण्याला तसेच शेतीसाठी किंवा उद्योगात उपयोग
करण्यास अयोग्य असते.
(२) नदीचे पाणी: पर्वतावरील र्बफ
वितळून तयार झालेले पाणी तसेच पावसाचे पाणी विविध झरे, ओहळांमधून मोठया प्रवाहाला येऊन
मिळत असते. हा मुख्य प्रवाह म्हणजे नदी. ही जेव्हा सपाट जमिनीवरुन वाहू लागते
तेव्हा त्यामध्ये अनेक पदार्थ मिसळत आलेले असतात आणि मिसळण्याची क्रिया सतत
चाललेली असते. प्रथम डोंगर माती, नंतर पूढे सपाट जमिनीवरची माती मृत जीवजंतू मानवी वस्ती
असलेल्या ठिकाणी मलमूत्र साडपाणी मृतप्राणी कारखान्यातील टाकाऊ रसायनेमिश्र्रित
पाणी असे कितीतरी घातक विषारी पदार्थ नदीच्या पाण्यात मिसळत असतात.
नदीचे पाणी पिण्यासाठी शेतीसाठी
वीजनिर्मितीसाठी उपयोगात आणले जात असल्याने नदीचे पाणी महत्वाचे असते.
(३) पावसाचे पाणी : समुद्र आणि
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील इतर जलसाठयावरील पाण्याची वाफ होऊन ती वातावरणात जात
असते. तिथे र्आद्रता मिळाल्याबरोबर पावसाच्या रुपाने ते पाणी जमिनीवर पडते.
सर्वसामान्यपणे पावसाचे पाणी फारसे अशूध्द नसते. मात्र औद्योगिकरणामूळे
कारखान्यातून सोडलेल्या विविध विषारी वायूमिश्र्रित हवा ढगांशी तसेच पावसाच्या
पाण्याशी मोठया प्रमाणावर संयोग पावल्याने वातावरणातच पाऊस दूषित होतो. हा
आम्लपर्जन्य सजीवसृष्टीचे नुकसान करतो. पावसाचे पाणी मोठया प्रमाणावर शेतीसाठी
उपयोगात येते ते जमिनीत मुरते त्यामूळे तलाव विहिरींना पाणी मिळते.
(४) झरे ओढे तलाव, तळे : पावसाच्या पाण्याने
निर्माण झालेले हे जलस्रोत शेवटी नदीला मिळतात. तळयाचे पाणी निसर्गत:च अडविले गेले
असते. तर विहिरी तलाव बांध धरणे या पाणी अडविण्याच्या मानवनिर्मित योजना आहेत.
भूगर्भातिल पाणी बाहेर काढून वापरण्यासाठी कूपनलिका या मोठया प्रमाणावर निर्माण
झाल्या आहेत.
पाण्याचा उपयोग क्षणोक्षणी, प्रत्येक ठिकाणी केला जात असतो, घरगुती वैयक्तिक आणि सार्वजनिक
स्वच्छतेसाठी, अन्न
शिजविण्यासाठी शेती उद्योग वीजनिर्मिती अशा अनंत प्रकाराने पाण्याचा वापर माणूस
करीत असतो. वाढती लोकसंख्या, वाढते
उद्योग, वाढत्या
गरजा यांमुळे ा वापर वाढत जातो आहे. वापरातूनच गैरवापरही होतो. प्रत्येक ठिकाणचे
जलस्रोत आणि त्यांची क्षमता यांचे प्रमाण ठिकठिकाणी कमी अधिक असल्याने कुठे महापूर
तर कूठे दुष्काळ, पाण्याची
टंचाई अशी विषमता दिसत असते.
भूमी :
भूमी सर्वच सजीव आणि निर्जीव यांचा
आधार आहे. सजीवांचा जन्म, विकास
आणि अंत हा भूमीशी निगडित असतो. डोंगर -पर्वत नद्यानाले यांनी जमिनीचा आधार लागत
असतो. अशा या आधारभूत जमिनीच्या प्रदूषणामुळे सजीव व निर्जीव या सगळयांवरच परिणाम
होत असतो.
भूमी हा पृथ्वीचा असा एक भाग
आहे की, त्यावर
आपण जीवजंतू पशूपक्षी, वनस्पती, वास्तव्य करीत असतात. भूमीच्या
आत अनेकविध खनिज पदार्थ, वायू, पाणी यांचा अनंत साठा असतो. हा
भूभाग माती, खडक, आणि विरघळून पुन्हा थंड घन
झालेल्या विविध घटकांपासून बनलेला आहे. याला स्थलमंडल (लिथोस्पेअर) असे म्हणतात.
या भूभागाच्या वरच्या स्तराला भूपटल म्हणतात. पर्यावरणाच्या दृष्टिने भूभाग भूमी, यांसंदर्भात विचार करताना
भूम्ीच्या आतल्या स्तराचाही विचार आवश्यक ठरतो. त्याप्रमाणे समुद्र नद्या अशा
पाण्याच्या साठयांचा तळाचे भागही भूभाग म्हणून पर्यावरणात विचारात घेणे आवश्यक
असते.
भूभागावरची माती ही प्रत्येक
ठिकाणी विविध प्रकारांची, विविध
गुणधर्माची असते. माती खडक फुटुन, तुटुन तयार होत असते. ही प्रक्रिया पृथ्वीच्या विभिन्न अशा
भौतिक रासायनिक आणि जैविक घडामोडीतून होत असते. वेगवेगळया ठिकणचे, वेगवेगळया तर्हेचे खनिज कण आणि
पाण्याबरोबर वाहात आलेले खडकांचे तुकडे, कण यांपासून तयार झालेले जे
पदार्थ मैदानी प्रदेशात पसरतात ती माती, वेगवेगळया ठिकाणची माती, तिच्या निपर्माणकार्यत अंर्तभूत
झालेल्या विविध घटकांच्या आधारे वेगवेगळया नावांनी ओळखली जाते. म्हणजे रंगाच्या
आधारे काळी माती पांढरी माती आणि चिकण माती भरड माती अशी विविध तर्हांनी मातीचे
वर्गीकरण केले जाते. विविध गुणधर्मानी युक्त असलेली विविध प्रकारची माती भिन्न, भिन्न प्रकारची पिके घेण्यासाठी
उपयोग आणली जाते.
जमिनीच्या वरच्या थरातली माती
उत्तम प्रतीची असते. ती निर्माण व्हायला प्रदीर्घ काळ लागतो. ही प्रक्रिया खूपच
गुंतागुतीची असते. वरची एक इंच माती तयार होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. ही उत्तम
प्रतीची माती तिचा दुरुपयोग केल्याने, चिती योग्य ती काळजी न
घेतल्याने अल्पावधीतच नापीक, कनिष्ठ
प्रतीची होत जाते.
भूमी ही अशी एक केंदि्रभूत घटक
आहे की, हा घटक
जर सुरक्षित राहिला तरच पुढच्या सर्व गोष्टी सुरळीत होऊ शक्तील निवास व्यवस्था, अन्नधान्य उत्पादन, पाणी संकलन वृक्षसंपदा, पर्यावरण संतुलन या सगळयांचा
मूलभूत आधार जमीन आहे. पण तिचा निवासव्यवस्था , अन्नधान्य उत्पादन किंवा पाणी
साठविण्यासाठी प्रचंड प्रमाणात गैरतर्हेने दुरुपयोग केला जात असल्याने आज सारे जग
अनेक तर्हेच्या दुष्परिणामांना तोंड देत आहे.
भूमीचे
प्रकार :
भूमीचे प्रकार आणि त्या आधारे
तिचेउपयोग यांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल.
(१)
सर्वसाधारण भूमी:
या प्रकारच्या जमिनीत शेती होत
असते ही जमीन देशाचा ठेवा समजली जाते. कारण या जमिनीवर अनेक प्रकारची जंगले आणि
त्यांच्या आधारे पशुपक्षी राहात असतात. यावरच पाण्याचे स्रोत असतात.
(२)
पाणथळ जमीन :
ज्या जमिनीत पाण्याचे प्रमाण
जास्त असते पाण्याचा भूगर्भात निचरा होत नाही. त्यामुळे ती जमीन दलदली जमीन होते.
शेतीमध्ये पाण्याचा अतिवापर आणि पाण्याचे मोठे साठे असलेल्या धरणे, तलाव, बांध, अशा ठिकाणांच्या आजूबाजूला सतत
पाणी झिरपत राहिल्याने अशा पाणथळ जमीनी निर्माण होतात. अशा जमिनी शेती किंवा
घरबांधणीला उपयोगी नसतात. मात्र पक्षी, प्राणी, जलचर, पाणवनस्पतींच्या संवर्धनासाठी
उपयोगी पडतात. मत्स्यसंवर्धनासाठी हल्ली या जमिनींचा उपयोग केला जातो.
(३)
पडिक जमीन :
जिथे फक्त खडक, मुरुमच आहे. माती, नाही, कारण ती नैसर्गिक कारणांमुळे
म्हणा किंवा मानवी कृतीमुळे म्हणा धुपुन गेली आहे. सुपिकता नष्ट झाली आहे किंवा
निरुपयोगी झाली आहें, असा
भूभाग कोणत्याही तर्हेच्या शेतीउत्पादनाला उपयोगी जमीन, म्हणून रुपांतर करण्यासाठी
सर्वच देशांत मोठया प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत.
(४)
वाळवंटी जमीन :
या प्रकारच्या जमिनीत मातीचे कण
मोठे असतात. त्यांच्यात पाणी जिरविण्याची क्षमता अगदीच कमी असते किंवा नसतेच.
त्यामूळे अशा जमिनींमध्ये उत्पादन घेता येत नाही. इथे पाण्याचाही अभाव असतो. हवेत
आर्द्रता नसते. त्यामुळे पाऊसही नसतो. यामुळे अशा जमिनींचे रुपांतर हलके हलके
वाळवंटात होत असते.
(५)
मॅंग्रोव्ह जमीन :
ही जमीन सामान्यपणे समुद्र
किनारे, खाडी
किनारे या परिसरात असते. या ठिकाणच्या मातीत क्षार ग्रहण करण्याची शक्ती असते. इथे
उगविणार्या वनस्पतींना मॅंग्रोव्हज म्हणतात. या वनस्पतींमुळे समुद्राचे किनारे
सुरक्षित राखण्यास, त्यांची
धुप रोखण्यास मदत होते.
पर्यावरणाचे स्वरूप आणि
त्यातल्या घटकांची माहिती घेत असताना आतपण, घटकांचे मानवी दृष्टिकोनातून
असलेले महत्वही लक्षात घेतले, प्रत्येक सजीवाचा पर्यावरणाशी, पर्यावरणातील विभिन्न घटकांशी
असणारा संबंध, या
विषयीच्या अभ्यासाला इकॉलॉजीपारिस्थितिकी म्हणतात. या अभ्यासाची वैशिष्टये स्वरूप
आणि महत्व समजून घेणे उद्बोधक ठरेल.
पर्यावरणात
माणसाचे एक महत्वाचे स्थान आहे. बुध्दीच्या जोरावर तो पर्यावरण -संकल्पनेत
महत्वाची भूमिका बजावत असतो. त्याचा योग्य किंवा दुरुपयोग करणे हे त्याच्याच हाती
असल्याने तो पर्यावरणाच्या केंद्रस्थानी आहे.
पर्यावरण म्हणजे
काय, त्याचे महत्वाचे घटक, त्यामध्ये
असलेलया साधनसंपत्ीचे महत्व यांचा आपण आतापर्यत विचार केला. त्या पार्श्वभूमीवर
मानवाचे पर्यावरणातील केंद्रस्थान आणि त्याच्या योग्य अयोग्य पर्यावरणावर झालेला
परिणाम यांचा अभ्यास करणे सोपे जाईल.
शिकारी ते शेतकरी
अशा क्रमाने मानवाचा विकास होत गेला जीवन अधिकाधिक सूखी व संपन्न करण्यासाठी त्याने
बुध्दी आणि कौशल्याचा वापर करायला सुरवात केली. मानवी उत्क्रांती व विकास यांचा
इतिहास घडत गेला. त्याने नवनवीन साधने, तंत्रज्ञान शोधून
काढले. यातूनच स्वार्थ, सज्ञ्ल्त्;ाा-संपज्ञ्ल्त्;ाी आणि निसर्गावर मात करण्याची महत्वाकांक्षा यांनी मानवाला
घेरुन टाकले. अनेक वैज्ञानिक शोध लावत त्याने सुखसोयींची साधने निर्माण केली.
वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी त्याने औद्योगिक क्रांतीचा आधार
घेतला. तेव्हापासून निसर्गाचे मूळ स्वरूपच विद्रुप आणि भाषांतरांवरूनरष्ट खंडीत
होऊ लागले. जंगले कापली जाऊ लागली. त्यातून शेतजमिनी निर्माण केल्या गेल्या आणि
इमारती बांधण्यासाठी त्याच शेतजमिनी नंतर उपयोगात आणल्या जाऊ लागली. कच्चा माल
मिळविण्यासाठी, इंधनाची वाढती गरज भागविण्यासाठी जमिनी मैलमैल खोल
खोदल्या गेल्या निसर्गसंपत्तीच्या बेसुमार वापरामुळे, तिचा झपाटयाने नाश होऊ लागला. ही प्रकिया गेल्या दोनशे
वर्षात अधिकाधिक वेगाने होऊ लागली. या आणि अशा कृत्यामूळे निसर्गाचा नाश तर होऊ
लागलाच, पण त्याचबरोबर माणसाची वृत्तीवरवरही बदलत गेली.
त्याची हाव अधिकच वाढत गेली. निसर्गाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलला.
निसर्गाला आपण अंकित करू शकतो, त्याच्यावर आपण
विजय मिळवू शकतो, आपलाच फक्त उपभोग घेण्याचा अधिकार आहे,बाकी इतर पशुपक्षी, वनस्पती, निसर्गसंपज्ञ्ल्त्;ाी, आपल्यासाठीच निर्माण होत असते. अशा कल्पनांनी माणूस
आत्मकेंदि्रत होत गेला. इतर घटकांना त्याने स्वार्थापोटी वेठीस धरले एवढेच नाही तर
माणसामाणसात देशादेशांमध्ये बळी तो कानपिळी या न्यायाने जीवघेण्या स्पर्धा सुरु
झाल्या ज्या विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग करुन त्याने नवनवीन शोध लावले, त्याच ज्ञानाच्चा आधारे त्याने इतर सजीव घटकांबरोबरच इतर
दुर्बल माणसांना, देशांना अंकित करण्यासाठी संहारक हत्यारे, शस्त्रे, निर्माण केली
यामध्ये वेगाने बदल घडवून अणुबाँबसारखे सारे जगच नष्ट करु शकणारे अस्त्र त्याने
तयार करुन जणू निसर्गाविरुध्द युध्द पुकारले.
याचा परिणाम
व्हायचा तोच झाला. निसर्गिक साधनसंपत्तीची टंचाई तर भासू लागलीच, पण जीवनाला आवश्यक अशी हवा, जमीन पाणी
प्रदूषित होऊ लागली.
(अ) पर्यावरणीय समस्या :
क्षणोक्षणी वाढत
जाणारी लोकसंख्या औद्योगिक क्रांतीमुळे शहरी लोकसंख्येत सतत पडत जाणारी भर आणि
माणसाची हाव यांमुळे प्रदूषण वाढतच गेले. यामुळे निर्माण होणार्या अनेक
प्रकारच्या समस्या, दुष्परिणाम यांविषयी पर्यावरण विशषज्ञम्प्;ाम्प्;ा आणि
लोकसंख्येचे अभ्यासक डेमोग्राफर्स यांनी फार पूर्वीच इशारा देऊन ठेवला होता.
प्रदुषण आणि लोकसंख्या या भस्मासूरांना वेळीच आवरले गेले नाही तर जगात अनेक गंभीर
समस्या निर्माण होतील. त्यांच्या या इशार्याची गंभीरपणे तातडीने दखल घेण्याची वेळ
आली पण त्यासाठी गेल्या पन्नास पंचावन्न वर्षात अस्त्रे यांचा वापर म्हणजे सगळया
जीवसृष्टीचाच संहार आहे. हे कळूनसूध्दा आपल्या चूका दुरुस्त करण्यासाठी माणूस तयार
होईना, पण जेव्हा जगभर अशा काही घटना घडत गेल्या की त्यामुळे
पर्यावरणाची समस्या ही स्थानिक, एखाद्या
देशापुरतीच नसून ती जागतिक समस्या आहे, हे माणसाला
हळूहळू का होईना पटत गेली. तसेच गेल्या पन्नास पंचावन्न वर्षात पर्यावरणाचे जड्:
व्याळ भयानक स्वरूप दाखविण्यार्या घटना घडल्या त्यामूळे मानवजात, प्राणिमात्र आणि निसर्ग संपज्ञ्ल्त्;ाी यांची अपरिमित हानी झाली. त्यांचा परिणाम म्हणून अनेक
चर्चा, विचारविमर्श परिसंवाद चळवळी अशांची मालिकाच सगळीकडे
सुरु झाली त्यातील काही प्रमुख घटनांची इथे थोडक्यात माहिती घेऊ या.
(आ) काही घटना :
६ ऑगस्ट १९४५ :
अमेरिकेने
जपानमधल्या हिरोशिमा शहरावर अणुबॉब टाकला. त्यात एक लाख तीस हजार नागरिक मरण पावले
व लाखो जबर जखमी झाले शहराचा ९०टक्के भाग त्यात उदध्वस्त झाला. काही दिवसांनी
नागासाकी शहरावर असाच बॉंब टाकण्यात आला. या घटनांना अर्धे शतक होऊनही त्या
अणुस्फोटचे दुष्परिणाम आजही तेथील नागरिकांना भोगावे लागत आहेत.
१ मार्च १९५४ :
पॅसिफिकमधील मार्शल
बेटावर अमेरिकेने पहिला हायड्रोजन बाँब फोडला. रोंगलॅप बेटांकडे वाहणार्या वार्यामधुन
त्या स्फोटामूळे निर्माण झालेले किरणोत्सर वाहत गेल्यामूळे त्या ठिकाणच्या
नागरिकांमध्ये कॅन्सर बळावला. काही जणांमध्ये जन्मजात विकृती निर्माण झाल्या.
१९५६ : जपानमध्ये मिथाईल मक्र्युरीची विषबाधा होऊन हजार एक लोक मरण
पावले तीन हजारांना अंधत्व आले. तर इतर हजारोंना मेंदूत बाधा झाली. चिसो नावाच्या
कंपनीने आपल्या कारखान्यातील पारा मिनिमाटा उपसागरात ओतून दिला होता. हा पारा
माशांच्या, पक्ष्यांच्या पोटात गेला व त्यामुळे ते मासे, पक्षी खाणार्यांना विषबाधा झाली होती. ही विषबाधा काही
वर्षानंतर लक्षात आली.
१९६२ : रॅशेल कार्झन याने सायलेंट संप्रिग हे पुस्तक अमेरिकत
प्रकाशित झाले. जंतुनाशकांच्या बेसुमार वापरातून त्याचे पृथ्वी व सभोवताल
यांच्यावर भयानक परिणाम यांचे पुस्तकात साधार विवेचन केले आहे. या पुस्तकामुळे
वादळी चर्चा घडून आल्या व त्याचा परिणाम अमेरिकेत डीडीटीवर बंदी घालण्यात आली.
१९६५ :
फ्रान्स सरकारने
वातावरणातील अणुचाचण्यांना प्रारंभ केला त्या १९७४ पर्यत चालूच राहिल्या म्युरुओरा
बेटाखाली शंभराहून अधिक भूमिगत चाचण्या झाल्या. या बेटाबाबतचा आरोग्यविषयक अहवाल
फ्रेंचांनी प्रसिध्द करण्याचे १९६३ नंतर थांबविले.
१९६७-१९७५:
व्हिएतनामच्या
युध्दांत अमेरिकेने जंगलातून एजंट ऑरेंज या वनस्पतिनाशक विषारी द्रव्यांचा प्रचंड
मारा केला त्यामूळे नद्या प्रदूषित झाल्या. गर्भपात व जन्मजात दोषांचे परिणाम भयानक
वाढले.
१९७२ :
पाच जून ते १६
जूनच्या दरम्यान मानवी पर्यावरणाबाबत स्टॉकहोम या स्वीडनमधील शहरात परिषद भरली.
त्यामूळे जगभर पर्यावरण, या विषयाची चर्चा सूरु झाली. पर्यावरणाला बाधक, हानिकारक होणार नाही असा विकास, अण्वस्त्र चाचण्यावंर जागतिक बंदी, विकसनशील देशांना पर्यावरणविकासाठी आर्थिक साहाय्य आणि ५
जून हा जागतिक पर्यावरण दिन हे परिषदेने प्रमुख ठराव केले.
१९७४ :
भारतात चिपको
आंदोलनाला सुरुवात गढवाल जिल्हयातील स्त्रिया वृक्षतोडीविरुध्द उपाय म्हणून
झाडांना कवटाळून बसू लागल्या.
१९७७ :
आफ़्रिकेतील
नैरोबी विद्यापिठातील एक प्राध्यापक वांगारी माथाई यांनी दि ग्रीन बेल्ट मुव्हेंमट
सुरु केली. त्या चळवळीतून एक कोटी झाडे लावण्यात आली. पन्नास हजारांपेक्षा जास्त
माणसे यात सामील झाली. आजही ही चळवळ चालू असून तिच्यामार्फ़त उत्पन्नाची साधने
निर्माण करणे व जलसंवर्धन वृक्षारोपणाचे कार्य केले जाते.
१९७८ :
अमेरिकेतील
न्युयार्क शहरात लव्ह कॅनॉल भागात नव्याने वस्ती करण्यात आली. नंतर असे आढळले की
या भूमीखाली पूर्वी औद्योगिक प्रक्रियेतून निर्माण झालेली टाकाऊ विषद्रव्ये
पुरण्यात आली होती. त्याचा परिणाम होऊन त्या वस्तीत गर्भपाताचे प्रमाण तिपटीने
वाढले. तसेच बालकांमध्ये जन्मजात दोषांचे प्रमाणही वाढले. स्थानिक नागरिकांनी लुई
गिब्ज यांच्या नेतृत्वाखाली हे प्रकरण उघडीस आणले.
मार्च ८२ : अमेरिकेतील पेनसिव्हानिया राज्यात हॅरिसबर्गजवळच्या अणूवीज
केंद्रात अपघात होऊन शेकडो जण मृत्यूमुखी पडले.
डिसेंबर ८४ :
भारतात भोपाळ
इथल्या युनियन कार्बाईड कारखान्यातून विषारी वायूची गळती होऊन पंचवीसशे लोक मरण
पावले वीस हजारांहून अधिक जायबंदी झाले.
२६ एप्रिल ८६ :
सोव्हिएत
युनियनच्या युक्रेन प्रांतातल्या चेर्नोबिल अणुभटी स्फोट झाला. त्यामुळे सभोवतालचे
१ लाख ३१ हजार चौरस किलोमीटरचे क्षेत्र प्रदूषित झाले. सगळया युरोपभर
किरणोत्सजारची पातळी वाढली. तीन लाख नागरिकांचे पुनर्वसन करावे लागले. नंतर
त्यांच्यात रक्तक्षय व रक्तविकारांचे प्रमाण वाढल्याचे दृष्टीस आले. या भागातले
वनस्पतिजीवनही नष्ट होत आले आहे.
१९८७ :
आपले सर्वाचे भविष्य
हा ब्रुडलॅड अहवाल प्रसिध्द झाला. एकविसाव्या शतकात समतोल विकास कसा साधता येईल
आणि विकसित व विकसनशील देशांमधील संबंध कसे सुधारता येतील यासाठी विश्र्वव्यापी
कार्यक्रम या अहवालात आहे.
२४ मार्च १९८९ :
अमेरिकेचे एक्झॉन
वाल्डेझ हे तेलवाहू जहाज फुटले. त्यामूळे एक कोटी गॅलन क्रुड ऑईल तीन हजार चौरस
मैल समुद्र क्षेत्रावर पसरले. तीनशेपन्नास मैलांचा सागर किनारा या तेलाने प्रदूषित
झाला. लाखो जलचर व समुद्रपक्षी यांची जीवहानी झाली.
जानेवारी १९९१ :
अमेरिका- इराक
यांच्या खाडीयूध्दात शेकडो तेलविहीरींना आगी लावण्यात आल्या. त्यामूळे पिण्याचे
पाणी व वातावरण प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाले.
याशिवाय १९४०
मध्ये अमेरिकेतल्या लॉस एंजल्स शहरावर संध्याकाळी प्रचंड धुर पसरला. त्या धुरामूळे
कित्येक नागरिकांना श्र्वास गुदमरल्यामुळे मृत्यू ओढावला होता. तर १९५२ मध्ये लंडन
शहरावर अशाच प्रकारच्या घटनेमुळे पाच हजारांवर व्यक्ती मरण पावल्या कारखान्यांतून
निघणारा धूर आणि वातावरणातल्या आर्द्रतेमुळे निर्माण होणारे धुके यांच्या
संयोगामूळे स्मॉग तयार होऊन ते वातावरणात दाट थराने दीर्घकाळ टिकून राहिले होते.
अशा तर्हेच्या
शेकडो लहानमोठया परंतु तेवढयाच गंभीर, धोकादायक घटना या
काळात घडत राहिल्या. त्यामुळे सगळयाच देशांना याचा धोका पोहोचत गेला.
(इ) संयुक्त राष्ट्रसंघाची २६ सूत्रे
पर्यावरणाला धोका
निर्माण करणार्या जागतिक स्तरावरच्या यांसारख्या घटनांची दखल काही देश, संस्था पर्यावरणवादी घेत होतेच, परंतु जागतिक स्तरावर हा प्रश्न तेवढया गंभीरपणे पाहिला जात
नव्हता. या प्रश्नाचे सर्वभक्षक स्वरुप तीव्र होत होते. त्यामूळे संयुक्त
राष्ट्रसंघाला या समस्यांकडे गंभीरपणे पाहण्याची वेळ आली पर्यावरणीय समस्या या
त्या त्या देशांच्या समस्या म्हणून त्यांच्याकडे इतरांनी दुर्लक्ष न करता त्या
सगळया जगाला चिंतित करणार्या आहेत आणि जागतिक हितासाठी त्या सामुदायिक रीतीनेच
सोडवायला हव्यात, असा दृष्टिकोन संयुक्त राष्ट्रसंघाने घेतला. याचा
परिणाम म्हणून १९७२ मध्ये मानवी पर्यावरण या विषयावर स्वीडमधल्या स्टॉकहोममध्ये
एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यामूळे शंभरावर देशांनी भाग
घेतला. त्यात २६ सूत्री महाधिकार पत्र, म्हणजे
मॅग्राचार्टा घोषित करण्यात आले. हा एक महत्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज समजला जातो.
त्याचे संक्षिप्त स्वरूप आता आपण पाहू या.
या परिषदेमध्ये
पुढील प्रमुख घोषणा करण्यात आल्या.
(१) मानव हा त्याच्या पर्यावरणाचा रक्षक आणि भक्षकही असतो.
त्यामूळे त्याला भौतिक स्थिरता तसेच स्वत:च्या बौध्दिक नैतिक सामाजिक आणि आत्मिक
वृध्दींची संधी प्राप्त होत असते. मानवजातीच्या प्रदीर्घ आणि अत्यंत खडतर अशा
उत्क्रांतीच्या वाटचालीत, मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीच्या
जोरावर पर्यावरणात अनेक प्रकारांनी आणि प्रचंड प्रमाणात आमूलाग्र बदल करण्याची
शक्ती मिळविली आहे. नैसर्गिक आणि मानीव असे दोन्ही प्रकारचे पर्यावरण माणसाच्या
हितासाठी आणि मूलभूत मानीव अधिकारांच्या उपभोगासाठी आवश्यक आहे.
(२) संपूर्ण जगातल्या मानवाचे हित तसेच त्यांचा आर्थिक विकास
यांवर मानवी पर्यावरणाची सुरक्षा व सुधारणा यांचा निश्चित असा प्रभाव पडत असतो आणि
हेच दोन अत्यंत महत्वाचे व प्रमुख विषय सध्या जगातील सर्व लोकांची अत्यावश्यक आणि
तातडीची आकांक्षा आहे आणि ती पूर्ण करणे सर्वच राष्ट्रांचे कर्तव्य आहे.
(३) आपल्या पर्यावरणात -सभोवतालच्या परिस्थितीत बदल करण्याची
माणसात क्षमता असते आपल्या विवेकबुध्दीने त्याने या क्षमतेचा उपयोग केला, तर लोकांचा विकास आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याची संधी
उपलब्ध होऊ शकेल. पण अविवेकी आणि अनुचित मार्गाने या क्षमतेचा वापर माणूस करु
लागला की, हीच शक्ती मानवजातीचे आणि त्याचबरोबर पर्यावरणाचे
प्रचंड नुकसान करू शकते आणि हे नुकसार पुन्हा भरुन न येणरे असू शकते. जल आणि हवेचे
भयानक प्रदूषण, पक्षी- प्राणी, वनस्पती यांचा
प्रचंड विनाश, परितंत्राच्या संतुलनात मोठया प्रमाणातील मानवी
हस्तक्षेपामूळे निर्माण झालेला असमतोल पुन्हा उत्पन्न होऊ न शकणार्या अनेक
संसाधनांची टंचाई आणि विनाश, मानवाच्या भौतिक मानसिक अशा अनेक स्तरांवर नुकसारन
वाढतच जाते आहे. यावरुन हे लक्षात आणणे आवश्यक आहे की माणूस आपल्या बुध्दीचा आणि
शक्तीचा उपयाग अविवेकी आणि अनुचित पध्दतीनेच करीत असून त्यामुळे तो त्याचे स्वत:चे
आणि पर्यावरणाचे प्रचंड नुकसान करीत आहे.
(४) विकसनशील देशातील बहूतेक पर्यावरणीय समस्या या त्या
देशाचा विकास न झाल्यामुळे उदभवलेल्या असतात. स्वत:च्या प्राथमिक गरजा भागविण्याइतकी
ज्यांची आर्थिक कुवत नाही असे कोटयावधी लोक अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण यांपासून वंचित आहेत म्हणूनच विकसनशील देशांनी या
लोकांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता आणि पर्यावरण विकास यांना केंद्रस्थानी ठेवूनच
आपल्या विकास योजना आखायला हव्यात. यासाठी विकसित आणि विकसनशील देशांतील दरी कमी
केली पाहिजे. विकसित देशांच्या पर्यावरणीय समस्या या त्यांच्या औद्योगिक
विकासाच्या संदर्भात निर्माण झालेल्या असतात.
(५) वेगाने वाढणारी लोकसंख्या पर्यावरणाच्या सुरक्षेच्या
दृष्टीने अनेक समस्या निर्माण करीत आहे. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक
पातळीवर योजना राबविणे आवश्यक झाले आहे.
(६) वैश्र्विक पर्यावरणाच्या परिणामांच्या दृष्टिने आपण
आपल्या कृतींमध्ये बेफिकीरी यांमुळे पृथ्वीच्या पर्यावरणाचे कधीही भरुन न येणरे
प्रचंड नुकसान आपल्याकडून होत आहे. भविष्यातही होऊ शकते याउलट परिपूर्ण माहिती आणि
बुध्दी वापरुन कार्य केले गेले तर आपण आपल्यासाठी आणि आपल्या पुढील पिढयांसाठी एका
आशादायक जीवनासाठी अनुकूल असे पर्यावरण निर्माण करु शकतो. चांगल्या जीवनासाठी आणि
पर्यावरणीय गुणवज्ञ्ल्त्;ाा वाढविण्यासाठी काही सिध्दांत असतात. निसर्गात स्वतंत्र
बुध्दीने राहण्यासाठी माणसाने निसर्गाबरोबर राहून चांगले वातावरण निर्माण
करण्याच्या आपल्या क्षमतेचा उपयोग करून घ्यायला हवा. मानवी पर्यावरणाची सूरक्षितता
आणि सुधारणा हेच आता सार्या मानवजातीचे एकमेव उद्दिष्ट बनले आहे.
(७) पर्यावरणाचा हा समतोल साधण्यासाठी प्रत्येक स्तरावर-
व्यक्ती, समाज, संस्था व शासन
यांनी सामुदायिकपणे जबाबदारी स्वीकारायला हवी. स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील
शासकीय संस्थांनी सर्वसमावेशक अशी पर्यावरणनीतीर व त्यासाठी कार्ययोजना तयार
करण्याचे महत्वाचे मूलभूत काम करायला हवे. विकसनशील देशांना या संदर्भात आपली
जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य आंतराष्ट्रीय पातळीवरून
होणे महत्वाचे आहे, गरजेचे आहे, बहुतांशी
पर्यावरण समस्यांना राष्ट्रांच्या सीमारेषा माहिती नसतात. या समस्या
राष्ट्राराष्ट्रांत आपले हातपाय पसरत असतात. त्या नष्ट करण्यासाठी सगळया
देशांमध्ये परस्परसहकार्याची नितांत आवश्यकता आहे.
ही परिषद जगातील
सर्व लोक आणि त्यांच्या पिढयांच्या हिताच्या दृष्टिनें मानवी पर्यावरणाचे सक्षण
आणि सुधारणा करण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याचे आवाहन सर्व देशांना आणि लोकांना
करीत आहे.
या घोषणांच्या
पार्श्वभूमीवर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत
एकूण २६ सुत्रे करण्यात आली. या सूत्रांचे स्वरूप असे आहे.
(०१) ज्यामध्ये माणूस सुखी आणि मर्यादाशील जीवन जगु शकेल, जिथे, स्वातंत्र्य, समता, असणि अन्न, वस्त्र, निवारा यांची पुरेशी सुविधा उपलब्ध असेल अशा पर्यावरणात
माणसाला जगण्याचा मूलभुत अधिकार आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या स्वत:साठी व भावी
पिढयांसाठी, सुरक्षित आणि सुधारलेले पर्यावरण उपलब्ध करुन
देण्याची महत्वाची जबाबदारीही त्याच्यावर आहे. या संदर्भात रंग- भेद, जात, धर्म, भेदभाव अशा
प्रकारच्या कोणत्याही वृत्तीवरवरची निंदा केली पाहिजे आणि त्यांना (दूर ठेवले
पाहिजे) नष्ट केले पाहिजे.
(०२) विचारपूर्वक केलेल्या योग्य त्या उपाययोजना आणि त्यांची
अंमलबजावणी करुन नैसर्गिक साधने, हवा, पाणी, जमीन, वनस्पती, जीवमात्र, आणि विशेषत, नैसर्गिक पारिस्थितिकी व्यवस्था ही आताच्या आणि भावी
पिढीच्या कल्याणासाठी सुरक्षित ठेवली पाहिजे,
(०३) पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपतीची पुनर्मिती करु
शकणारी क्षमता सांभाळून ठेवायला हवी आणि त्यांची शक्यतो पुरस्र्थापना करायला हवी.
(०४) वन्यप्राण्यांची आणि त्याच्या निवासस्थळांची सुरक्षा
आणि योग्य अशी व्यवस्था करण्याची जबाबदारी माणसाची आहे. त्यांना आज अनेक कारणांनी
धोका निर्माण झाला आहे. म्हणून आर्थिक विकासाया योजना तयार करताना निसर्ग संरक्षण
वन्यजीव संरक्षण यांना त्यात योग्य ते स्थान देणे आवश्यक आहे.
(०५) ज्यांची पुर्ननिर्मिती होत नाही अशा नैसर्गिक
साधनसंपतीचा उपयोग काटकसरीने करायला हवा. ती संपूर्णपणे नष्ट होणार नाही याची
काळजी घ्यायला हवी या संपत्ती चा लाभ संपूर्ण मानवजातीला कसा होईल याकडे लक्ष
ठेवायला हवे.
(०६) विषारी रसायने, पदार्थ, तसेच उष्णतेचे उत्सर्जन पर्यावरणाला हानी पोहचवत असतात.
म्हणूनच त्यांचे प्रमाण वाढू न देण्याची काळजी घेतली पाहिजे प्रदूषण रोखण्यासाठी
सगळयाच देशांत चालणार्या लोसंघर्षाला न्याय मिळायला हवा.
(०७) सागरी प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक राष्ट्राने कडक
उपाययोजना करायला हवी. जलचरांचे जीवनच अशा प्रदूषणामूळे नष्ट होते. माणसाच्या
आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. असे पदार्थ समुद्रात मिसळून प्रदूषण निर्माण करणार
नाही. याची प्रत्येक राष्ट्राने काळजी घेतली पाहिजे.
(०८) माणूस जिथे राहतो आणि जिथे काम करतो तिथले वातावरण
चांगले राहण्यासाठी आर्थिक आणि सामाजिक प्रगती आवश्यक असते. त्याचा जीवनस्तर
उंचावण्यासाठी आणि सुयोग्य पर्यावरणासाठी आर्थिक आणि सामाजिक अनुकूल वातावरण
निर्माण करणे आवश्यक असते.
(०९) विकासाला वंचित राहिल्यामुळे आणि वारंवार येणार्या
नैसर्गिक संकटांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असतो. पर्यावरणाची ही हानी भरून
काढण्यासाठी विकसित देशांकडून आर्थिक व तांत्रिक साहाय्य उपलब्ध केले गेले पाहिजे.
(१०) विकसनशील देशांसाठी वस्तूंच्या किमती स्थिर असणे आवश्यक
आहे. तसेच त्यांच्या कच्च्या मालाला योग्य किंमत मिळणे महत्वाचे आहे. कारण
अर्थव्यवस्था आणि पर्यावरण व्यवस्था यांचा परस्पर संबंध असतो.
(११) सर्व देंशांची पर्यावरणनीती ही सतत उन्नतशील असायला हवी
विकसनशील देशांच्या सध्याच्या भविष्यातील विकास योजनांवर त्या नीतीचा अनिष्ट
परिणाम होणार नाही यासाठी पर्यावरणनीती तयार करतानाच काळजी घेणे आवश्यक आहे.
(१२) विकसनशील देशांना त्यांची स्थिती पाहून व आवश्यकता
लक्षात घेंऊन त्याप्रमाणे पर्यावरण सुधारणा व सुरक्षा कार्यायासाठी साधनसामग्री
आणि आर्थिक मदत उपलब्ध करुन द्यायला हवी. त्यामुळे आपल्या विकास योजना तयार करताना
ती राष्ट्रे त्यात पर्यावरण संरक्षणाला महत्वाचे स्थान देतील.
(१३) पर्यावरण संवर्धनात नैसर्गिक साधनसामग्रीची व्यवस्था
विवेक दृष्टिने व्हावी यासाठी राष्ट्रांनी आपल्या विकास योजना तयार करताना समग्र
आणि व्यापक अशी दृष्टी ठेवली पाहिजे. त्यामुळे मानवी पर्यावरणाचे संरक्षण आणि
विकास यांचा योग्य मेळ घातला जाऊ शकेल.
(१४) लोकसंख्या आणि शहरीकरण यांवर अशा तर्हेची योजना तयार
केली गेली पाहिजे. की ज्यामुळे पर्यावरणाला हानी न पोहोचता सगळयांना जास्तीत जास्त
तर्हेने सामाजिक, तसेच आर्थिक आणि पर्यावरणाीय लाभ मिळू शक्तील. या
संदर्भात वंशवादी आणि वसाहतवादी प्रवृत्तीच्या फायद्यासाठी केलेल्या योजना प्रकल्प
बंद करावे लागतील.
(१५) विकास आणि पर्यावरण संरक्षण संवर्धनाची गरज, यांमध्ये निर्माण होणारा कोणताही वाद विवेकपूर्ण पध्दतीने
सोडविला जाऊ शकतो, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.
(१६) काही क्षेत्रांमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरण व
विकासावर अनिष्ट परिणाम होतो. तर काही क्षेत्रांमध्ये अपुर्या लोकसंख्यमुळे
पर्यावरण संवर्धन व विकास गती घेत नाही, त्या ठिकाणी
मुलभूत मानवी अधिकांरांसाठी नि:पक्षपाती, डेमोग्राफर्सने
सुचविलेली नीती राष्ट्रांकडून अंगिकारली जावी.
(१७) पर्यावरणाची गुणवता वाढविण्याची गरज आहे हे ध्यानात
घेऊन पर्यावरणीय संसाधनांच्या सुनियोजनाचे, त्यांच्या
व्यवस्थापनाचे आणि नियंत्रणाचे काम राष्ट्रीय संस्थांकडे सोपविण्यात यावे.
(१८) आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी काम करणारे विज्ञान आणि
तंत्रज्ञान पर्यावरण संकटाचे निदान करण्यासाठी तसेच त्यावरच्या उपाययोजना आणि संकट
नियंत्रित करण्यासाठी आणि लोककल्याणासाठी उपयोगत आणले पाहिजे.
(१९) आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी काम करणारे विज्ञान, आणि तंत्रज्ञान पर्यावरण संकटाचे निदान करण्यासाठी तसेच
त्यावरचा उपाययोजना आणि संकट नियंत्रित करण्यासाठी आणि लोककल्यासाठी उपयोगात आणिले
पाहिजे.
(१९) मानवाच्या हितासाठी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या
हेतूने व्यक्ती आणि संस्था तसेच मुले, तरुण आणि वृध्द
यांच्यासाठी पर्यावरण आणि शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. प्राथमिक सुविधांचा अभाव
असलेल्या व्यक्ती आणि समाज यांना पर्यावरण शिक्षण देऊन त्याचे महत्व पटवून दिले
जाणे आवश्यक आहे. कारण अशा शिक्षणामुळेच त्यांच्यात पर्यावरण जागृती निर्माण होईल.
आणि पर्यावरण संरक्षण व संवर्धाच्या कामात त्यांचाही सहभाग लाभेल, तसेच प्रसार माध्यमांकडूनही पर्यावरण शिक्षणासंबंधी
जनजागृती होणे आवश्यक आहे.
(२०) पर्यावरण समस्येसंबंधी विशेषत. विकसनशीलन देशांमध्ये , राष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण समस्यांवर
वैज्ञानिक संशोधन चालू राहिले पाहिजे. नवनव्या संशोधनांची माहिती त्यांना
सातत्याने मिळाली पाहिजे. या देशांना कोणताही आर्थिक बोजा न पडता पर्यावरणीय
माहिती उपलब्ध होत राहणे आवश्यक आहे.
(२१) संयुक्त राष्ट्राचे घोषणापत्र आणि आंतराष्ट्रीय
कायद्याच्या आधारे, कोणत्याही राष्ट्राला त्याच्या प्रदेशातील
साधनसंपतीचा, पर्यावरण नीतीला धरुन उपभोग घेण्याचा अधिकार आहे.
मात्र त्यामुळे इतर कोणत्याही देशाला हानी पोहोचणार नाही याची त्या राष्ट्राने
काळजी घेऊनच उपभोग घ्यायचा आहे.
(२२) एखाद्या, राष्ट्रात
चाललेल्या कामामुळे जर त्या राष्ट्राबाहेर प्रदूषण निर्माण होत असेल किंवा
पर्यावराणाला धोका निर्माण होत असेल तर तिथल्या लोकांच्या नुकसानीची जबाबदारी आणि
नुकसान भरपाई देण्यासाठी तरतूद असणारा आंतरराष्ट्रीय कायदा तयार करण्यासाठी
राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
(२३) आंतराष्ट्रीय स्तरावर स्वीकारली गेलेली किंवा राष्ट्रीय
पातळीवर निर्धारित केलेली गुणवज्ञ्ल्त्;ाा मानके लागू
करण्यापूर्वी विविध देशांच्या प्रचलित सामाजिक व्यवस्था आणि त्या मानकांची त्या देशातील
उपयुक्तता लक्षात घेऊनच लागू करणे योग्य ठरेल. कारण विकसित देशांच्या दृष्टिने जी
मानके उपयुक्त कायदेशीर किंवा यथायोग्य असतील तीच मानके विकसनशील देशांच्या
दृष्टीने निरुपयोगी तसेच सामाजिक मूल्यांच्या दृष्टीने अनिष्ट, अयोग्यही होऊ शकतात.
(२४) लहान आणि मोठया पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन
यांसंबंधीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रकरणे समान पातळीवर, परस्पर सहकार्याने सोडविली गेली पाहिजे, सगळीकडे,चालू असलेल्या
घडामोडींमुळे बिघडणार्या पर्यावरणावर नियंत्रण ठेवणे, ते पूर्वस्थितीवर आणणे याची योग्य ती व्यवस्था द्विपक्षीय
किंवा बहुपक्षीय स्वरुपात सहकार्यच्या भावनेचे करणे आवश्यक आहे. ती व्यवस्था
करताना त्या त्या देशाचे हित व सार्वभौमत्व लक्षात घेऊनच करायची आहे.
(२५) आंतराष्ट्रीय संघटना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी
एका कुशल समन्वकाची गतिशील भूमिका पार पाडत आहे. ( हे राष्ट्रांनी पटवून दिले
पाहिजे ) याची खात्री राष्ट्रांनीच द्यायला हवी.
(२६) माणूस आणि पर्यावरणाला परमाणू हत्यारांच्या
परिणामांपासून तसेच जनसंहाराच्या इतर साधनांपासून वाचवले पाहिजे. अशा संहारक
शस्त्रास्त्रांवर बंदी घालण्याच्या आणि ती संपूपणे नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय
संघटनांच्या राष्ट्रांनी तात्काळ करार केले पाहिजेत.
(ई) पर्यावरण कार्यक्रमाचा इतिहास :-
या महाधिकार
पत्राच्या (मॅग्नाचार्टा ) आधारे युनेस्कोच्या अंतर्गत संयुक्त राष्ट्र पर्यावरण
कार्यक्रम कमिटीची स्थापना झाली. त्यामध्ये पन्नास सदस्य होते. या कमिटीद्वारे
१९७५ मध्ये आंतराष्ट्रीय पर्यावरणीय शिक्षण कार्यक्रम अंतर्गत बेलग्रेड
कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले. त्यात बेलग्रेड घोषणा पत्र' प्रसिध्द करण्यात आले जागतिक पर्यावरणाची बिघडत चालेलेली
अवस्था थांबविण्यासाठी आणि तिच्यात सुधारणा करण्यासाठी पर्यावरण शिक्षणाचा व्यापक
कार्यक्रम हातात घेण्याची घोषणा या पत्रातून करण्यात आली. याच कॉन्फरन्समध्ये
प्रत्येक देशाने आपापली पर्यावरण नीती बनविण्याची निर्णय घेतला. बिघगत चाललेल्या
पर्यावरणाचा तोल सांभाळण्यासाठी देशातल्या जमिनीच्या ३३ टक्के भूभागांवर वनाची अनिवार्यता
असल्याचे मांडण्यात आले.
त्यानंतर दहा
वर्षानी म्हणजे. १९८२ मध्ये, पर्यावरण परिषदेचे दहावे वर्धापन वर्ष साजरे
करण्यासाठी जगातील बहुसंख्य देशांचे प्रमुख पुन्हा आफ़्रिकेतील नैरौबी इथे एकत्र
आले. १० जून ते १८ जून १९८२ या काळात चाललेल्या परिषदेमध्ये १०५ देशांनी भाग
घेतला. तेव्हा एक विशेष चार्टर प्रसिध्द केला. त्याला नैरोबी घोषणा -पत्र या
नावाने ओळखले जाते. या चर्ाटरमध्ये विशेष भर देण्यात आला आहे तो १९७२ मधील
स्टॉकहोम परिषदेच्या घोषणापत्रावर. त्या वेळी असलेल्या परिस्थितीत दहा वर्षानंतर
फरक पडलेला नसून ती आजही तेवढीच चिंतनीय असल्याचे नमूद करुन पूर्वी सूचविलेल्या
योजनांनुसार पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संवर्धनाचे कार्य पुढेही चालू ठेवतात ते
आणखी प्रभावशाली करण्याचे ठरवले गेले.
(उ) भारतातील पर्यावरण कार्यक्रम :-
भारतात १९७२
पासून पर्यावरण क्षेत्रात योनाबध्द कार्यक्रम सुरु झालेला होता. देशाच्या
पर्यावरणासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी नॅशनल कमिटी फॉर एनव्हायर्नमेंटल प्लॅनिंग
अॅण्ड कोऑर्डिनेशन या समितीची स्थापना झाली आणि त्याचप्रमाणे औद्योगिक प्रदूषणाला
(आळा) प्रतिबंध (निर्माण) करण्यासाठी केंद्रीय व राज्यस्तरीय प्रदुषण नियंत्रण
मंडळाची स्थापना करण्यात आली. या कमिटीने काही सूचना मांडल्या त्यानुसार १९८०
मध्येच केंद्रामध्ये पर्यावरण विभाग स्वंतत्र रितीने स्थापण्यात आला. नंतर
राज्यांमध्येही विभाग उघडण्यात आले. या कमिटीचे रुपांतर नंतर नॅशनल कमिटी फॉर
एनव्हायर्नमेंटल प्लॅनिंग मध्ये करण्यात आले. या कमिटीने पर्यावरण क्षेत्रातील
सर्वप्रथम संरक्षणाची, संवर्धनाची गरज टाळून चालणार नसल्याने स्पष्ट केले.
त्या प्राथमिक मूलभूत बाबी अशा-
(१) औद्योगिक प्रदूषणाचे नियंत्रण-
(२) नष्ट होत चाललेल्या वनस्पती व प्राण्यांच्या परजातीचे
संरक्षण
(३) पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा आणि किमान स्वच्छता
आरोग्य व्यवस्था.
(४) देशातील जमीन, पाणी आणि वनस्पती
या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि योग्य व्यवस्थापन .
या उद्दिष्टांना
समोर ठेवून पर्यावरण विभागतर्फे अनेक योजना तयार करण्यात आल्या. प्रदूषण
नियंत्रणांच्या दृष्टीने 'जल आणि हवा प्रदूषण नियंत्रण कायदा' बनविला गेला. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ हा पूर्वीच्या
कायद्यांना अधिक पुष्टी-शक्ती मिळावी म्हणून करण्यात आला. वन्य प्राण्यांचे
संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने राष्ट्रीय उद्याने, वन प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने
राष्ट्रीय उद्याने, वन अभयारण्य यांची देशभर ठिकठिकाणी स्थपना करण्यात
आली. १९७३ मध्ये प्रोजेक्ट टायगर' स्थापना झाली
१९८२ मध्ये राष्ट्रीय पातळीवर दोन विशेष कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली.
(१) गंगा शुध्दीकरण प्रकल्प
(२) देशभर वृक्षारोपण (प्रकल्प) मोहिमा.
यांच्या आधारे
गावागावांतून स्वच्छता मोहिमा, प्रदूषण नियंत्रण
मोहिमा तसेच वृक्षारोपणाच्या कार्याना आरंभ करण्यात आला. सगळया देशभर जनजागृती होऊन
सर्व स्वरांवर उत्साहाने कामे सूरु झाली.
परंतु आपल्या
देशाचे दुर्दैव हे की इथे कोणतेही कार्य सुरु करताना प्रारंभी जो उत्साह. जी जिद्द
असते, एकदिलाने काम करण्याची जी इच्छाशक्ती असते ती नंतर
पुढे कमी होत जाते. म्हणूनच देशाची अत्यंत महत्वाची आणि जनहिताची ही पर्यावरण
योजना कार्यवाहीत आणताना पुढे तिच्यात शिथिलता आली. प्रदूषण रोखण्यासाठी असलेल्या
कायदेकानंूनाचा, नियमाचा फारसा परिणाम झाला नाही. त्यांची अमलबजावणी
करण्यात शिथिलता आली. वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक स्वच्छता नाहीशी होऊन
प्रदूषणाचा जोर वाढला गरजा भागविण्यासाठी बेसुमार जंगलतोड होत गेली. पिण्याचे पाणी
आणि अन्न यांची टंचाई भासू लागली काही प्रमाणात वस्तुस्थिती होती आणि त्यात भर म्हणून काही पर्यावरण तज्ञांम्प्;ाांनी भयावह आणि निराशाजनक पर्यावरणाचे एकूणच चित्र उभे
केले. आशावादी दृष्टिकोनाऐवजी सगळीकडेच निराशेचेच वातावरण निर्माण झाले.
जगण्यासाठी
लागणारे अन्न, वस्त्र, निवारा, या मूलभूत गोष्टींची कमतरता भविष्यात भासणार आहे आणि
त्याचबरोबर पिण्याचे पाणी आणि श्र्वास घेण्यासाठी प्राणवायू यांची टंचाई होणार आहे
व त्यामुळें सर्व जीवनच संकटात सापडणार आहे असे आपल्याला वाटते का ? जर तसे वाटत असेल तर ती निराशा आपण झटकून टाकायला हवी आणि
त्याचबरोबर बिघडत चाललेल्या पर्यावरणात सुधारणा करण्यासाठी आणि त्याचे सतुलन
राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी.
प्रदूषणाचे
स्वरुप , प्रकार, कारणे परिणाम आणि
उपाय :-
आधीच्या दोन उपघटकांमध्ये
आपण पर्यावरण, पारिस्थितिकी, परितंत्र आणि
नैसर्गिक साधनसंपज्ञ्ल्त्;ाी यांचा विचार केला आणि पर्यावरणीय समस्या यांची
माहिती घेतली. या पार्श्वभूमीवर प्रदूषणाचे स्वरूप, व्याप्ती यांचे
स्वरूप समजावून घेणे आता सोपे जाईल. या मुद्यात त्याची चर्चा केली जाईल.
(अ) प्रदूषण म्हणजे काय ?
हवा, पाणी, जमीन, इत्यादी
पर्यावरणातील घटकांमध्ये इतर पदार्थ मिसळत असतात. त्यामुळे त्या घटकांच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये बदल घडून येतो. या
बदलांमुळे त्या घटकांचा किंवा त्या पदार्थाचा काहीच उपयोग होत नाही. शिवाय त्याचा
प्राणिमात्राच्या आरोग्यालाही धोका पोहोचतो अशावेळी ही झालेली प्रक्रिया आणि
झालेला परिणाम या दोघांनाही प्रदूषण म्हटले जाते. ज्या पदार्थापासून हे प्रदूषण
होते त्यांना 'प्रदूषण म्हणतात.
प्रदूषणाच्या
आणखी काही व्याख्या अशा आहेत.
ट्ठ ट्ठ[ ट्ठ ट्ठ[ ट्ठर्ट्ठ ह्म ट्ठट्ठह्मड्ड" ट्ठ ट्ठ ट्ठ ट्ठ ट्ठ ट्ठट्ठद्म" ट्ठट्ठ
मिसळण्यामुळे नैसर्गिक अथवा मानवी पर्यावरणावर जो परिणाम होतो त्याला प्रदूषण म्हणतात.
|
-हवा, पाणी, आणि जमीन यांच्या
भौतिक जैविक किंवा रासायनिक द्रव्यांमध्ये झालेल्या ज्या अनिष्ट परिवर्तनामुळे जीवमात्राचे आरोग्य , सुरक्षा आणि कल्याण यांना
हानी पोहोचते, त्याला प्रदूषण म्हणताता.
|
या व्याख्यांवरुन
आपल्या एक लक्षात येईल. की मानवी जीवनाच्या मूनभूत गरजा भागविण्यासाठी हवा, पाणी, जमीन निर्भेळ रुपाने जर मिळत नसतील, तर चांगल्या जीवनाची कल्पनाच अशक्य आहे. आणि हे प्रदूषण
मानवानेच निर्माण केले आहे. त्याचे स्वरुपही जड्:व्याळ् भयानक आहे.
(आ ) प्रदूषणाचे प्रकार :-
प्रदूषणाचे मुख्य
प्रकार असे केले जातात.
(१) हवा प्रदूषण,
(२) जल प्रदूषण ,
(३) भूमी प्रदूषण,
(४) ध्वनी प्रदूषण ,
हवा प्रदूषण :-
हवेचे प्रदूषण
दोन प्रकारचे होते.
(अ) नैसर्गिक प्रदूषण:वादळे, वणवे, ज्वालामुखी, अवर्षण, इत्यादी घडामोडींमुळे हवेचे प्रदूषण होते. अर्थात निसर्गत:त
या प्रदूषणावर उपाययोजना होत असतात.
(आ) मानवनिर्मिती हवा प्रदूषण : विविध उद्योगधंदे, निर्मिती प्रक्रिया कारखाने, स्वयंचलित वाहने, घरगुती इंधनज्वलनातून हवेचे सातत्याने प्रदूषण होत असते.
नैसर्गिक
प्रदूषाचे परिणाम त्या त्या भागातच जाणवतात. अशा संकटांचे परिणाम सर्वदूर, राष्ट्रांच्या सीमा ओलांडून होत असतात. स्वयंचलित वाहने, उद्योग कारखाने जगात सगळीकडेच असल्याने अहोरात्र, अनेक वर्षे हवा प्रदूषित होते आहे.
हवा प्रदूषात
मुख्यत: विविध तर्हेचे गॅसेस, धूर प्रदूषक
असतात. धरगुती इंधनाच्या ज्वलनातून निघणारा तसेच स्वयंचलित वाहनांतून बाहेर पडणारा
धूर, सडलेले कुजलेले पदार्थ तसेच कचर्यातून बाहेर पडणारा
धूर यांमधील विविध प्रकारच्या विषारी वायूंमूळे हवेचे सतत प्रदूषण होत असते. ही
विषारी वायूमिश्र्रित हवा श्र्वसनातून शरीरात गेल्यामुळे किंवा त्वचेशी संर्पक
झाल्यामूळे आरोग्याला अनेक प्रकारांनी धोका निर्माण होत असतो. सगळयात जीवसृष्टीला
हा धोका पोहोचत असतो. या प्रदूषणाला कारणीभूत विषारी वायू हेच मुख्यत: असतात.
(२) जलप्रदूषण :-
पाणी हा वनस्पती
सृष्टीबरोबरच सर्व सजीवांच्या जीवनाचा मूलाधार आहे. पाण्याचा क्षणोक्षणी उपयोग
करावा लागतो. अगदी तहान भागविण्यापासूनच उद्योग क्षेत्रात, शेतीत सगळीकडे पाणी आवश्यक असते. पर्यावरणातल्या या मूलभूत
घटकाचे महत्व इतके आहे की, पाण्याच्या मालकीवरून भांडणे मारामार्या होतात.
भविष्यात पाण्याच्या साठयांच्या मालकीवरून युध्दे भडकतील असे समाजशास्त्रज्ञाम्प्;ाांचे मत आहे.
(अ) वाढती लोकसंख्या:- वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची
गरजही वाढती असते. साहजिकच यातून पाणी टंचाई निर्माण होते.
(आ) पाण्याचे असमान वितरण:- विविध जलस्त्रेातांपासून मिळणारे
पाणी विविध ठिकाणी कमी जास्त प्रमाणात असते. जास्त पाणी पाऊस असलेल्या प्रदेशांतून
ते टंचाई असलेल्या इतर ठिकाणी नेण्याची यंत्रणा पुरेशी नसते. त्यामुळे वरुन पडणारे
पाणी वात जात समुद्राला मिळते. तसेच असलेल्या पाण्याचे सर्व स्तरांतील नागरिक
शेतकर्यांना योग्य वाटप होऊ शकत नाही.
(इ) पाण्याचा बेसुमार गैरवापर :- आपल्या घरगुती वापरात आपण अत्यंत
अयोग्य तर्हेने पाण्याचा वापर करत असतो. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी
हॉटेलमध्येू पाणी बेफिकिरीने वाया जात असते. पुढील उदाहरणांवरुन आपण दैनंदिन
क्रियांसाठी पाण्याचा वापर किती बेफिकिरीने करीत असतो हे दिसून येईल.
नळ सोडून ठेवून
दात घासणे - १० लिटर
संडासात फलश करणे
- १५ लिटर
नळ सोडून
धारेखाली हात तोंड धुणे -२५ लिटर
नळ गळत असल्याने
- २५ लिटर
नळ सोडून भांडी
धुणे - २० लिटर
शॉवरखाली स्नान
करणे -५० लिटर
स्नानासाठी टबचा
वापर करणे - २०० लिटर
वॉशिंग मशिनमध्ये
कपडे धूणे - ५० लिटर
अशी ही यादी
कितीतरी मोठी होईल.
या पार्श्वभूमीवर
आणि पाण्यांचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन, पाणी प्रदूषणाचे
स्वरुप, त्याची कारणे आणि परिणाम व त्यांवरील उपाययोजना समजून
घेणे सोपे होईल.
पर्यावरणातील
अजैविक घटकांमध्ये वायूप्रमाणेच जमीन व पाणी यांचा समावेश होतो. त्यांचे वितरण व
गुणवज्ञ्ल्त्;ाा यांच्या बदलांमुळे पर्यावरण स्थितीवर परिणाम होत
असतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असतो.
पाण्याचे प्रदूषण
म्हणजे सजीव सृष्टीला हानीकारक ठरतील असे पदार्थ किंवा उष्णता पाण्यात मिसळण्याची
प्रकिया'अशी पाणी प्रदूषणाची एक व्याख्या आहे.
पाण्यामध्ये
एखादा विरघळणारा किंवा न विरघळणारा पदार्थ जेव्हा पाण्यात पडतो किंवा मिसळतो, त्यामूळे पाण्याच्या रासायनिक आणि जैविक गूणधर्मात फरक पडतो, तेव्हा त्या पाण्याची मूळ गूणवता नाहीशी होते. हे पाणी
माणूस पशूपक्षी वनस्पती, शेती किंवा उद्योग यांना उपयोगी होत नाही. ते पाणी
म्हणजे प्रदूषित पाणी असेही म्हणता येईल.
भूमी प्रदूषण :-
पर्यावरणीय
घटकांमधील हवा, पाणी, या घटकांचा आपण
पर्यावरणाच्या दृष्टीने अभ्यास केला. भूमीचे प्रकारही आपण पहिल्या घटकात अभ्यासले.
आता भूमीच्या प्रदूषणाविषयी माहिती घेऊ.
भूकंप ज्वालामुखी
अशा नैसर्गिक घडामोडीमूळे जमिनीमध्ये मोठे बदल घडून येतात, पुरांमुळे प्रतिवर्षी लाखो हेक्टर जमिनीमध्ये मोठे बदल घडून
येतात. पुरांमुळे प्रतिवर्षी लाखो हेक्टर जमिनीवरचा मातीचा थर वाहून जातो तर पाणी
आणि वारा यांच्या सततच्या मार्यामुळे भूस्खलन होत असते. परंतु घडामोडी निसर्गत:च
घडत असतात. मानवी कृत्यामुळे होणारे भूमी प्रदूषणाचे स्वरुप आणखी वेगळे आणि
चिंतनीय आहे.
(अ) भू-प्रदूषण म्हणजे काय ?
भूमीच्या भौतिक
रासायनिक किंवा जैविक गुणर्धात कोणत्याही तर्हेचे जे अनावश्यक परिवर्तन होते
किंवा केले जाते आणि ज्या परिवर्तनाचा सजीवांवर परिणाम घडून येतो किंवा त्या
भूमीचे त्यामुळे नैसर्गिक गुणधर्म आणि उपयोग नष्ट होतात, त्याला भू -प्रदूषण म्हणतात.
भू-प्रदूषणाची
कारणे कोणत ?
जमिनीचा गैर, अनुचित उपयोग यांमुळे तिच्या प्रतीत बदल घडतात. अगदी
सुरवातीला माणूस शिंकार करुन जगत होता. नंतर शेतीचा शोध लावून तो स्थिर झाला.
शेतीसाठी त्याने अरण्ये तोडली आणि आता घर, कारखाने खाणी
धरणे अशा गरजा भागविण्यासाठी उत्तम प्रतीची शेतजमीनही वापरली जाते आहे. जमिनीच्या
प्रतीत बदल होतो तो असा जशी लोकसंख्या वाढत जाते वनजमीन, शेतजमीन घरे, कारखान्यांसाठी, रस्ते कालव्यांसाठी वापरली जात असते. तसेच खाणींसाठी
तेलविहिरींसाठी जमिनीचे उत्खनन केले जाते. विटा तयार करण्यासाठी मातीचा वापर होतो
आणि खते, कीटकनाशके व पाणी यांचा शेतजमीनीत अतिवापर होत
राहिल्याने ती ही क्षारपड जमीन होत चालली आहे.
भू- प्रदूषणाची
प्रमुख कारणे जमिनीचा गैरवापर, अयोग्य हाताळणी
आणि बेफिकिरी, ही असली तरी आणखीही काही कारणाने भू -प्रदूषण होत
असते.
घरगुती व
सार्वजनिक कचरा, सांडपाणी औद्योगिक कचरा, वापरलेली टाकाऊ रसायने, कृषीकचरा-खते
कीटकनाशके जमिनीवर फेकली जातात. जमिनीवर कचर्याचा ढीग वाढत जातो. त्यामुळे
जमिनीची गुणवज्ञ्ल्त्;ाा खालावत जाऊन ती प्रदूषीत होत जाते.
भू-प्रदूषाणाचे
परिणाम :-
(१) जमिनीवर कचरा साठत राहिल्याने तिचे प्रदूषण होऊन तिच्या
गुणवत्तेत फरक पडल्याने ती नापीक होते. पण त्याचबरोबर मानवी आरोग्य बिघडून रोगराई
पसरते. दुर्गंध दलदल, घाण यांमुळे रोग पसरविणार्या डास, उंदीर, घुशी यांचा
सुळसुळटात होतो.
(२) जमिनीचे मूळचे सगळेच कार्य संपुष्टात येते.
(३) अशा जमिनीखालच्या पाण्याची पातळी कमी होते.
(४) जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढून ती नापीक होते.
(५) अशा जमिनीवरील वृक्ष -वनस्पतींच्या वाढीवर दुष्परिणाम
होतो.
ध्वनी प्रदूषण :-
त्रासदायक, असह्य, नकोसा वाटणारा
किंवा ध्वनी म्हणजे गोंगाट असतो. त्यात कोणतेही माधुर्य , नाद नसतो. तो कर्णकटू कर्कश्श आणि विसंवादी आवाज असतो.
गोंगाट हा त्रासदायक, संतापजनक दु:ख देणारा निद्रानाशक असतो. गोंगाटामुळे
चिज्ञ्ल्त्;ा विचलित होते. एकग्रता भंग पावतो आणि मनात गोंधळ
निर्माण होतो. चिडचिडेपण येते. डोके भणभणते अशा त्रासदायक आणि अपायकारक आवाजाला
ध्वनी प्रदूषण म्हणतात.
ध्वनी म्हणजे काय ?
वास्तविक ध्वनी
हा सर्वसाधरण प्रक्रियेत परिणाम असतो. तो मुळात समस्यारहित असतो. सजीव जेव्हा हालचाल
करतो किंवा एखादी भावना, विचार व्यक्त करतो, त्या स्वरामुळे
किंवा हालचालीच्या आवाजामुळे हवेवर दाब पडतो आणि तरंग निर्माण होतात, त्यातून आवाज येतात तो ध्वनी हा ध्वनी नैसर्गिक घटना, हालचाली यांतूनही निर्माण होतो. तसेच कृत्रिम उपकरणे, यंत्रे यांमुळेही आवाज उत्पन्न होत असतो.
आवाज लहान मोठा
असू शकतो त्याला ध्वनीची तीव्रता' म्हणतात. अधिक
मोठा आवाज जेव्हा कानांना नकोसा वाटू लागतो तेव्हा तो गोंगाट हेातो. तो गोंगाट
ध्वनी प्रदूषणाचे कारण आहे.
अॅलेक्यांडर
ग्रॅहम बेल यांनी दूरध्वनीचा शोध लावला त्यांनीच ध्वनिमापनाची पध्दत शोधून काढली.
त्यात जे प्रमाण दिले आहे. त्याला डेसीबेल म्हणतात, एक डेसीबेल
म्हणजे बेलचा दहावा भाग. जो आवाज एक माणूस आपल्या कानाने ओळखू शकेल, त्या आवाजाच्या मापाला एक डेसीबेल म्हणतात.
व्यक्ती
सामान्यपणे ७०-८० डी. बी. पर्यतचा ध्वनी सहन करु शकते, यापेक्षा अधिक डी. बी. असलेला आवाज, मग तो अगदी सुरातला, संगीमय असला तरी
तो गोंगाटच असतो म्हणूनच तो प्रदूषित आवाज.
चढया पट्टीतला आवाज
किंवा वारंवारता :-
जेव्हा एखादी
वस्तू ध्वनिस्रोताच्या रुपाने कार्य करते, तेव्हा तिच्या
उच्च नीच पट्टीच्या साहाय्याने त्या आवाजाची गती समजून घेता येते. एखाद्या
आवाजाच्या कंपनाच्या प्रमाणाला वारंवारता' (फिक्वेन्सी)
म्हणतात. ही वारंवारता र्हटस मध्ये मोजतात. जितकी वारंवारता जास्त तितकी आवाजाची
कंपने जास्त. एखादी व्यक्ती प्रत्येक सेकंदाला २० पासून २० हजार र्हटस सपर्यत
म्हणजे तितक्या कंपनांचा आवाज ऐकू शकते. त्यापेक्षा जास्त र्हटस असलेला आवाज ऐकणे
अशक्यच असते. त्यामुळे श्रवण यंत्राला हानी पोहचते.
ध्वनीचा अवधी :-
एखादा आवाजस्रोत
कितीवेळ आवाज करतो हेही महत्वाचे आहे. अधिक तीव्रतेचा आवाज कमी वेळा ऐकला तरी
हानीप्रद असतो. उदाहरणार्थ विजांचा कडकडाट क्षण हा आवाज आपल्याला घाबरवून सोडतो.
तसेच कमी तीव्रता असलेला परंतु सातत्याने बराच वेळ येणारा आवाजही त्रासदायक असतो.
उदाहरणार्थ, रातकिडयांची किरकिर ही सुध्दा आपल्याला नकोशी असते.
डिस्कोसारखे तीव्रध्वनीचे अधिक काळापर्यंत चालणारे आवाज त्रासदायक असतात.
आवाज ध्वनी
म्हणजे काय हे थोडक्यात पाहिल्यावर आता त्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रषदूणाची कारणे, परिणाम व यांवरील उपाय समजून घेणे सोपे जाईल.
ध्वनी प्रदूषणाची
कारणे :-
यामध्ये दोन
प्रकार करता येतील.
(१) नैसर्गिक : यात वादळ, पाऊस, भूकंप, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, इत्यादी आवाज
येतात.
(२) मानवनिर्मित : यात स्वयंचलित वाहनांचे आवाज, त्यांचे कर्कश्श भोंगे कारखान्यातील यंत्रांचा खडखडाट
घरगुती उपकरणांचे आवाज, जत्रा उत्सवातले ध्वनिक्षेपक ढोलताशांचे आवाज, लढाईतील आवाज, रेडिओ, टीव्ही, यांचे उच्च आवाज
याचबरोबर शहरातील गर्दी बाजार, मिरवणूका, घोषणा, गाणी, भाषणे, अशा अनेक तर्हेच्या
तीव्र आवाजांमुळे ध्वनी प्रदूषण होत असते.
ध्वनी प्रदूषणाचे
परिणाम :-
अनेक लहानमोठया
शहरांत ध्वनीची तीव्रता वाढत आहे. शांतता नष्ट झाल्यातच जमा आहे. अशा तर्हेने आणि
गतीने गोंगाट वाढत राहिला तर भविष्यकाळात अत्यंत तीव्र गोंगाटामुळे मृत्यू येऊ
शकेल. ध्वनी प्रदूषणामुळे माणसाचे आरोग्य व मनस्वास्थ यांची नजीकच्या काळात भयंकर
हानी होणार आहे.
प्रदूषण
पृथ्वीवर वनस्पती, मानव व इतर प्राणी ज्या पर्यावरणात राहतात त्या
पर्यावरणातील विविध घटकांत संतुलन प्रस्थापित झालेले असते. सजीवांच्या एका जातीने
त्याज्य केलेली वस्तू दुसर्या एखाद्या जातीला पोषणासाठी इष्ट असू शकते. अशा
परस्परावलंबनामुळे पर्यावरणाची संरचना सातत्याने टिकूण राहते. परंतु सध्याच्या
अफाट लोकसंख्यावाढीमुळे व औद्योगिकीकरणामुळे पृथ्वीच्या पर्यावरणातील नेहमीच्या
घटकांव्यतिरिक्त इतर अपायकारक घटक मोठया प्रमाणात पर्यावरणात शिरतात. त्यामुळे
पर्यावरणाच्या विविध घटकांतील संतुलन बिघडते व पृथ्वीवरील वनस्पती व प्राणी
यांच्या जीवनाच्या सातत्याला धोका निर्माण होतो. अशा क्रिया प्रक्रियांमुळे
पर्यावरणी प्रदूषण उद्भवते.
प्रदूषणाचे मूलघटक
:-
पर्यावरणात
मुख्यत्वेकरुन शिरणारी प्रदूषके म्हणजे ज्वलनक्रियेमुळे निर्माण झालेले पदार्थ , मानवी उत्सर्ग नि:श्र्वासित केलेले वायू , निरनिराळया वस्तुंचे सूक्ष्म धूलिकण, विकृतिकारक सूक्ष्मजीव , विविध पदार्थाचे
बाष्प कण, निरनिराळे विषारी वायू, विविध उद्योगात
वापरलेले विद्रावक कृषिकार्यासाठी वापरलेली खते व कीटकनाशके ही होत. त्यांच्या
जोडीला तापमानाच्या अंतिरेकी सीमा, अवरक्त प्रारण
जंबुपार प्रारण आणि क्वचित प्रसंगी तीव्र दृश्य प्रारण, आयनीकारक प्रारण , किरणोत्सर्गी
समस्थानिकांनी बाहेर टाकलेले प्रारण, गोंगाट परा-उच्च
कंप्रतेचे ध्वनी आणि विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मतरंगलांबीचे विद्युत चुंबकीय प्रारण
यांसारखे अनिष्ट घटक वातावरणांत प्रदूषक म्हणून प्रवेश करतात. स्थलकालानुरुप हया
भौतिक , रासायनिक व जैव घटकांचे प्रमाण व उपद्रव्य सहय मर्यादांबाहेर
गेल्यास प्रदूषण उद्भवते.
जलीय प्रदूषण :-
पृथ्वीवर सु. १.४ १० लिटर इतके मुबलक पाणी आहे. माणसाला ४२,००० कोटी लिटर पाणी मिळू शकेल. हया पाण्याचा अतिशय मोठा भाग
महासागरात सामाविलेला आहे. त्यात विविध प्रकारची लवणे व रसायने मोठया प्रमाणात
विरघळलेली असतात. दैनंदिन उपयुक्ततेच्या दृष्टीने हे खारे पाणी जसेच्या तसे घेऊन
वापरण्या जोगे नसते. त्या पाण्यावर काही प्रक्रिया करुन वापरात आणणे शक्य असते, पण अशा निर्लवणीकरणाला फार खर्च येतो. औद्योगिक कामासाठी
असे गोडे करुन घेतलेले पाणी वापरणे आर्थिक दृष्टया परवडणारे नसते. त्यामुळे
नैसर्गिक रीत्या उपलब्ध असलेले गोडे पाणीच मोठया प्रमाणावर वापरतात. कारखान्यांतून
बाहेर पडणारे पाणी प्रदूषित असते. ते नद्यांत सोडले जाते किंवा समुद्राकडे वळविले
जाते. कारखान्यांतून बाहेर पडणारे दूषीत पाणी एका ठिकाणी साठवून काही प्रक्रियांनी
शुध्द केल्यानंतर ते पुन्हा वापरात आणण्याच्या शक्यतेचा क्वचितच विचार केला जातो .
ज्यामुळे प्रदूषित पाण्याचे व जलीय दूषितीकरणाचे प्रमाण एकसारखे वाढत जाते व गोडया
पाण्याचे साठे हळूहळू संपुष्टात येऊन पाण्याचे दर्भिक्ष्य निर्माण होते.
पर्यावरणाची
अवनती :
सजीवांना अनुकूल
असलेले पर्यावरण मानवी हस्तक्षेपांमुळे सजीवांना प्रतिकूल बनले. यालाच पर्यावरणाची
अवनती असे संबोधले जाते.
अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी
मानव पर्यावरणातील विविध घटकांचा वापर करतो. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकरण
यांमुळे पर्यावरणातील घटकांचा वापर वाढला. शेती, वस्त्या आणि
उद्योगंधद्यांच्या विस्तारासाठी मानवाने वृक्षतोड केली. औद्योगिकरणामुळे सजीवांना
निरूपयोगी किंवा घातक वायू, द्रव्ये, पर्यावरणात
सोडली. त्यामुळे हवा, पाणी, भूमी दूषित झाले.
सजीवांवर त्याचा विपरित परिणाम झाला.
पर्यावरणात
वनस्पती, मानव व इतर प्राणी इत्यादी सजीव घटक आणि हवा, पाणी आणि भूमी इत्यादी निर्जीव घटक आहेत. पर्यावरणातील
सजीवांची वाढ व विकास सजीव-निर्जीव अशा दोन्ही प्रकारच्या घटकांवर अवलंबून
असल्याने या घटकांपैकी कोणताही घटक दूषित किंवा सजीवांना निरूपयोगी ठरल्यास त्याचा
सजीवांच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. हे टाळण्यासाठी, पर्यावरणाची गुणवज्ञ्ल्त्;ाा टिकविण्यासाठी
मानव, वनस्पती व प्राणी या सजीवांचे परस्परांशी असलेले
पर्यावरणातील नैसर्गिक प्रमाण कायम राहणे तसेच या सजीवांना अनुकूल अशी हवा, पाणी आणि भूमी या निर्जीव घटकांची नैसर्गिक शुद्धता कायम
राखणे अत्यावश्यक आहे.
प्रदूषण :
कारखान्यातील
कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डाय ऑक्साईड, सल्फर डाय
ऑक्साईड, विविध धातूंचे कण यांसारखे अनावश्यक घटक पर्यावरणात
जास्त प्रमाणात सोडले जातात. या घटकांचे पर्यावरणातील प्रमाण वाढते आहे. इतर
सजीवांप्रमाणेच ते घटक मानवालाही हानिकारक ठरतात.
मानवनिर्मित
त्याज्य पदार्थांमुळे पर्यावरणात सजीवांना अपायकारक जे बदल होतात त्यांना प्रदूषण
असे संबोधले जाते. प्रदूषणामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या व त्यांपैकी
काहींचे पृथ्वीवरील अस्तित्वच नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. त्यावरून आजच्या
पर्यावरणविषयक जागतिक महत्वाच्या समस्या या मानवनिर्मित आहेत व पृथ्वीवरील
पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यास, पर्यावरणाची
अवनती होण्यास मानवच जबाबदार आहे हे लक्षात येते. ज्या घटकांमुळे ही अवनती जास्त
झाली आहे.
प्रदूषणाचे प्रकार
हवेचे प्रदुषण :
कारखान्यांत, वाहतूक साधनांत तसेच स्वयंपाकासाठी तेल व कोळशाचा वापर केला
जातो. त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड, कार्बन
डाय-ऑक्साईड व सल्फर डाय-ऑक्साईड यांसारखे वायू हवेत मिसळतात. हे सर्व वायू
प्रमाणाबाहेर झाल्यानंतर ते सजीवांच्या आरोग्यास हानिकारक ठरतात.
कार्बन
डाय-ऑक्साईड हा वायू वातावरणातील तपांबर या थरात भूपृष्ठाजवळ आढळतो. शुद्ध हवेत
हया वायूचे प्रमाण वातावरणाच्या केवळ ०.०३- असते. पृथ्वीने उस्तर्जित केलेल्या
उष्णतेचे हा वायू काही प्रमाणात शोषण करतो व त्यामुळे वातावरणाचा खालचा थर उबदार
राहण्यास मदत होते. वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेस कार्बन डाय ऑक्साईड
वापरतात. विसाव्या शतकापर्यंत वातावरणातील या वायूच्या प्रमाणात वाढ झाली नव्हती.
विसाव्या शतकातील
वाढत्या औद्योगिकिकरणामुळे कार्बन डाय-ऑक्साईडचे प्रमाण वाढले व यात शतकात
वनक्षेत्र मोठया प्रमाणावर कमी झाल्यामुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे
प्रमाण वाढत राहिले. कार्बन डाय ऑक्साईडच्या वाढीमुळे या शतकात वातावरणाच्या
तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली. ही वाढ अशीच चालू राहिली तर ध्रुव प्रदेशातील र्बफ
वितळून सागर पातळी उंचावेल.
सल्फर डाय ऑक्साईड
वायू श्वसनावाटे शरीरात गेल्यास श्वसनाचे रोग होतात तसेच हवेतील सल्फर डाय ऑक्साईड
व नायट्रोजन ऑक्साईड हया वायंूचा हवेतील इतर घटकांशी संयोग होऊन त्यांचे रूपांतर
सल्फ्युरिक व नायटि्रक आम्लांमध्ये होते. ही आम्ले पावसाच्या पाण्यात मिसळली
गेल्यास आम्लयुक्त पाऊस पडतो. आम्लयुक्त पर्जन्यामुळे झाडांची वाढ खुंटते. पाणी
दूषित होते. अशा पाण्यात जलचर जगू शकत नाहीत.
क्लोरोफ्लुरोकार्बन
नावाचे रासायनिक संयुग शीतपेटया, वातानुकुलनाची
यंत्रे आणि जेट विमानांच्या इंधनात वापरले जाते. आधुनिक युगात वरील सर्व साधनांचा
वापर वाढत असल्यामुळे वातावरणातील क्लोरोफ्लुरोकार्बनचे प्रमाण वाढत आहे. हया
संयुगांचा ओझोन वायूशी संयोग झाल्यास वातावरणातील ओझोनचे प्रमाण कमी होते.
वातावरणातील ओझोन वायू सुर्यापासून येणार्या अतिनील किरणांची तीव्रता कमी
करण्याचे कार्य करतो. ओझोन वायूचे प्रमाण कमी झाल्यास सुर्यापासून येणारे अतिनील
किरण अडविले न जाता सरळ पृथ्वीवर येतील. पृथ्वीवर येणार्या अतिनील किरणांचे
प्रमाण वाढल्यास त्यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका संभवतो.
त्याचप्रमाणे
अतिनील किरणांचे प्रमाण वाढल्यास पृथ्वीच्या तापमानात वाढ होईल व वनस्पतींना आणि
पर्यायाने सर्व सजीवांना धोकादायक ठरेल.
जलप्रदूषण :
पाण्यात अपायकारक
द्रव्ये मिसळली गेल्यास जलप्रदुषण होते. नदीत कपडे, धुणे, गुरे धुणे, यांमुळे नदीचे
पाणी पिण्यास अयोग्य बनते. शेतात वापरलेली रासायनिक खते, कीटकनाशके पाण्यात मिसळतात. त्यामुळे जलप्रदुषण होते.
जगातील बरीच शहरे नद्यांजवळ विकसित झालेली आढळतात. शहरातील सांडपाणी नद्यांमध्ये
सोडल्यामुळे त्यांचे पाणी प्रदूषित होते. हेच पाणी पिण्यासाठीही वापरले गेल्यामुळे
पाण्यावाटे पसरणार्या रोगांचे प्रमाण वाढते.
टोकिओ, मुंबई, कलकज्ञ्ल्त्;ाा, सिंगापुर यांसारखी मोठी शहरे ही किनारपट्टीवरील
प्रदेशात आहेत. या प्रदेशांतील लोकवस्ती आणि विविध उद्योगधंदे यांतील सांडपाणी
समुद्रात किंवा महासागरात सोडले जाते. यामुळे समुद्रात व महासागराचा
किनारपट्टीलगतच्या मानवी वस्तीजवळचा भाग प्रदूषित होतो. जहाजातील तेल सांडल्यामुळे
ही महासागरातील पाणी प्रदूषित होते. त्यामुळे जलचरांना अपाय होतो व त्यांचा नाश
होतो.
कारखान्यामध्ये
विविध प्रक्रियांसाठी पाण्याची आवश्यकता असते. कारखान्यांतील दूषित पाणी
नद्यांमध्ये सोडले जाते व त्यामुळे नदीचे पाणी वापरास अयोग्य ठरते.
जलप्रदुषणाची
तीव्रता वाढल्यास मासे व इतर जलचरांना अपाय होतो. दूषित पाण्यातील मासे खाल्ल्यास
माशांच्या शरीरात गेलेले घातक विषारी द्रव्य मानवाच्या शरीरात जाऊन वेगवेगळया
व्याधी निर्माण होतात.
भूमीप्रदूषण :
हवा, पाणी याप्रमाणेच भूमी हा पर्यावरणातील महत्वाचा घटक आहे.
भूमीचा वापर मानव वेगवेगळया कारणांसाठी करतो. शेतीचा व्यवसाय पूर्णत: भूमीच्या
प्रकारावर, सुपीकतेवर अवलंबून आहे. भूमीप्रदूषणामुळे एखाद्या
प्रदेशातील भूमीची नैसर्गिक उपयुक्तता कमी होते. वृक्ष तोडल्यामुळे भूमी उघडी पडते
व मृदेची धूप होऊन तिची सुपीकता कमी होते. काही शेतकरी शेतातील मातीचा वरचा थर
विटा तयार करण्यासाठी विकतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते व शेतीचे उत्पादन
कमी होते. उष्ण पट्टयातील कोरडया प्रदेशात पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त
असते. अशा प्रदेशात अती जलसिंचनामुळे काही वेळा क्षारांचे शेतजमिनीत संचयन होऊन
मृदा क्षारयुक्त होते. वाळवंटाजवळील प्रदेशात वार्यामुळे वाळूचे संचयन होते व असे
संचयन सुपीक मृदामंध्ये झाल्यावर पीक घेणे अशक्य होते.
रासायनिक खते व
कीटक नाशकांचा अतिरिक्त वापर केल्यामुळे जमिनीचा कस कमी होतो. जमिनीतील शेतीस
उपयुक्त जीवजंतूंचाही नाश होतो. यामुळे कालांतराने शेतातील उत्पादन घटते. हे
दृष्टचक्र थांबविण्यासाठी ग्रामिण भागात रासायनिक खतांऐवजी सेंदि्रय खतांचा वापर
केल्यास भूमी व जलप्रदूषण टाळता येईल. मोठया शहरांच्या बाहेर शहरात रोज जमा होणारा
कचरा आणून टाकला जातो. त्या कचर्यात असणारे अनेक घातक पदार्थ तसेच
प्लॅस्टिकसारख्या अविघटनशील घटकांमुळे जमीन निरूपयोगी बनते. सामाजिक सुविधांची
कमतरता आणि सामाजिक जाणिवेचा अभाव यांमुळे शहरातील काही भाग कचरा टाकून किंवा घाण
करून वापरास अयोग्य केलेले आढळतात.
कचर्यामुळे
होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी व उपलब्ध साधन सामुग्रीचा जास्तीत जास्त वापर
व्हावा या उद्देशाने मोठया शहरांमध्ये जमा होणार्या कचर्यातील कागद, धातंूचे तुकडे, काचा इत्यादी
पदार्थ वेगळे करून त्यांवर प्रक्रिया करून नवीन घटकांची पुनर्निर्मिती करतात.
मोठया शहरांमध्ये कचरा गोळा करणारे लोक वरील प्रकारे कचर्याचे वर्गीकरण करून कचरा
कमी करण्यास मदत करतात.
औद्योगिक
प्रगतीव्दाारे मानवाने स्वत:चा विकास साधताना पर्यावरणाचा व पर्यावरणातील इतर
सजीवांचा फारसा सजीवांचा फारसा विचार केलेला नाही. त्यामुळे पर्यावरणाची अवनती
झाली. ही अवनती थांबविण्यासाठी प्रदूषणावर आणि वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे
अत्यंत महत्वाचे आहे.
Thanks for A good article. I feel it will be quite useful and motivating to the school and college students.
ReplyDeleteIF you allow me/ permit me, i wish to use some part full article as open education resource. THe copy right etc will remain with u. we will give the link as well.
निकिता म्याडम खूपच अभ्यासपूर्ण लेख आहे. माझा ब्लाग kesharaai.blogspot.in ला भेट द्या. धन्यवाद!
ReplyDeleteफारच छान लेख आहे निकिता माझा पण एक Blog आहे क्रुपया जर तुम्हाला वेळ असेल तर तो नक्कीच बघा shorttricksinhindi.blogspot.in धन्यवाद !
ReplyDeleteKhup Chan.. महितीपूर्ण लेख
ReplyDeleteखुप छान .......
ReplyDeleteVery useful
ReplyDeleteNice work ..I really appreciate
Very useful
ReplyDeleteNice work ..I really appreciate
खुप छान सविस्तर माहिती ...
ReplyDeleteVery useful & nice information
ReplyDeletekhup chan mahiti ......
ReplyDeleteParyavaran nyay mhanaje kay?
Yabaddal mahiti milel kay?
सर तुम्ही फक्त पर्यावरणाच्या र्हासाचे मुख्य कारणे दाखवा खुपच छान आहे या नोंदी
ReplyDeleteचांगल तर लिहिले परंतु योग्य ठिकाणी विरामचिन्हे वापरली नाही. एकदा तुमच्या पोस्टला योग्य विरामचिन्हे वापरून पोस्ट ला पुन्हा पोस्ट करा.
ReplyDeleteआणि यामध्ये खोड्या फार चुका दिसत आहे, त्या दुरुस्त करा . तुम्ही चांगलं काम करत आहात. मला क्षमा करा पण तुमचं मन दुखवण्याचा माझा विचार नव्हता.sorry,
ReplyDeleteखूप गरजेची माहिती मिळाली धन्यवाद
ReplyDeleteखूपच छान माहिती दिली सर.........
ReplyDeleteखूप छान माहिती आहे.
ReplyDeletekhup chhan
ReplyDeleteGood information
ReplyDeleteKhup chan sir
ReplyDeleteThanks sir nice information
ReplyDeleteखूप छान माहिती मिळाली आहे सर धन्यवाद
ReplyDeleteThanks sir for your nice information
ReplyDeleteTHANKS SIR VERY IMPORTANCE IMFORMATION
ReplyDeleteHow to Download of all information?
ReplyDeleteUse android UC browser apk.
DeleteThank you very much sir
ReplyDeleteGood information
ReplyDeleteVery important theory for environmental students...mostly thanks for shared you information...
ReplyDelete12th arts evs new selyabars project on पर्यावरणीय समस्या पुढिल घटकांप्रमाणे
ReplyDelete1- प्रस्तावना
2- विषयाचे महत्त्व
3- प्रकल्प कार्य उद्दीष्ट
4- प्रकल्प कार्यपद्धती
5- निरीक्षणे
6-माहितीचे विश्लेषण
7- निष्कर्ष
मराठी माध्यम चे प्रकल्प पाहिजे
Jagtik tapman wadh
ReplyDeleteगोडे पाणी कोणत्या गोष्टी साठी
ReplyDeleteडॉ.shekhar kovale अगदी सोप्या शब्दात लिहिले आहे आम्हाला हि भाषणात किवा लेखात संधर्भ म्हणून वापरता येईल
ReplyDeleteExcellent 😍🙌🏻👍🏻
ReplyDelete